माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi

माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi

माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या ” माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी माझी मातृभूमी या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आम्हाला अशा आहे की हा निबंध तुमच्यासाठी नक्कीच फायदाचा ठरेल.

माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi

मित्रांनो मातृभूमी म्हणजे जमीन. जमीन मधून आपल्याला अन्नपदार्थ पासून जीवनावश्यक्य असणाऱ्या सर्व गोष्टींची कृती आपल्याला जमिनीपासून होते. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा देखील जमिनीमधूनच पूर्ण होतात. जमिनीमुळे आज आपण सुखा समाधान आणि नांदत आहोत. ज्या मातीमध्ये आपण वाढतो मोठे होतो मातीमध्ये पिकणारे अन्न खातो त्या मातीला किंवा जमिनीला मातृभूमी असे म्हणतात.

माझी मातृभूमी भारत माता आहे. मी एक भारतवासी आहे त्यामुळे माझी मातृभूमी भारत माता आहे. मला माझ्या मातृभूमीवर खूप प्रेम आहे कारण या मातृभूमीतूनच मी मोठा झालो.

मी भारतात राहते म्हणून माझी मातृभूमी हि भारत आहे. जसे शेतकऱ्यांसाठी तो ज्या जमिनीवर राहतो. जिच्यातून तो पीक काढतो. तिला कसतो, दिवस रात्र तिची काळजी घेतो. त्यात उगणाऱ्या धान्याची काळजी घेतो. त्याची लागवड करतो. ती त्याची मातृभूमी असते.

मातृ म्हणजे आई आणि भूमी म्हणजे धरती. सरळ शब्दात सांगायचे तर धरती माता. प्रत्येक देशातला व्यक्ती ज्या जमिनीवर राहतो, तिला आपली मातृभूमी म्हणतो.

जगभरामध्ये विविध देश आहेत. प्रत्येक देशामध्ये देश वासी देखील राहत असतात व प्रत्येक देशवास्याला आपल्या देशावर खूप प्रेम असते. म्हणजेच आपली मातृभूमी ही प्रत्येक व्यक्तीलाच प्रिय असते. आपण ज्या भूमीमध्ये जन्म घेतो त्या भूमीतच मरणार असतो. म्हणून मातृभूमी आणि आपले नाते हे खूप दृढ आहे. मातृभूमी आणि आपले नाते हे कालचे आजचे नसून प्राचीन काळापासून चालत आले आहेत जेव्हापासून माणसाचा जन्म झाला तेव्हापासून आपण मातृभूमीचे जोडलेले आहोत.

आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होतात जीवनावश्य सगळ्या गोष्टीची पूर्ती मातृभूमीतूनच होते.

ह्याच मातिती जे अन्न आपला शेतकरी मित्र कष्ट करून उगवतो. रात्रंदिवस त्याची काळजी घेतो. ऊन वारा पाऊस याचे त्याला भान नसते. फक्त आपली धरती माय त्याला माहित असते. कारण तिच्या काळजावर नांगर चालवून तो आपले व आपल्या जनतेचे पोट भरण्याचे काम करतो. त्यामुळे मात्र भूमी ही आपली जननी माता आणि आई समान आहे.

माझी मातृभूमी ही भारत माता आहे.

सुजलाम् सुफलाम्,

मलयज शीतलाम्

सस्यशामलाम्,

मातरम्, वन्दे मातरम् ॥

असे ज्या भूमीचे वर्णन केले आहे, ती भारतभू माझी मातृभूमी आहे. माझ्या भारत मातेचा इतिहास हा खूप मोठा वैभवशाली आहे. त्यासोबतच माझ्या भारत मातेची संस्कृती आणि सभ्यता देखील पाश्चात्त्य देशांमध्ये ओळखली जाते. माझ्या भारत मातेला ऐतिहासिक मोलाचा वाटा लाभला आहे. माझ्या मातृभूमी मध्ये अनेक मोठे राजे महाराजे सम्राट शूरवीर धाडसी पुरुष होऊन गेले.

माझा भारत देश विरांचा देश म्हणून देखील ओळखला जातो कारण माझ्या भारतीय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, झाशी की राणी, भगतसिंग स्वतंत्र वीर सावरकर जवाहरलाल नेहरू महात्मा फुले सावित्रीबाई फुले, एपीजे अब्दुल कलाम यांसारखे महान नेते होऊन गेले.

या सर्व महान वीरांची साक्ष म्हणजे माझी मातृभूमी माझी भारत माता आहे. यासोबतच माझ्या भारत मातेला संतांची भूमी देखील म्हणून ओळखले जाते. कारण माझ्या मातृभूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई इत्यादी महान संत होऊन गेले.

रामायण, महाभारत, भगवद्गीता सारखे महान ग्रंथ देखील माझ्या मातृभूमीची ओळख आहेत.

या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे. आजही या संस्कृतीचे महात्म्य जगात ओळखले जाते.प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होतो. ज्ञानभूमी होती.

माझी मातृभूमि निबंध मराठी

प्राचीन काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून भारताला मान होता. जही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अध्यात्माचा अभ्यास करायला येतात. Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

माझ्या भारत देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन गोष्टी शिकायला दिल्या अध्यात्मामध्ये तर माझा भारत देश अव्वल दर्जाचा होता त्यासोबतच

आयुर्वेद, गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिल्या आहेत.

निसर्गही माझ्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नदयांनी भारतभू सुजलाम् केली आहे.

त्यामुळे येथे सृष्टीची विविध रूपे पाहायला मिळतात, भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्शच उभा करतो. भारताच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे.

भारतात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि औदयोगिक क्रांती झाली. भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहिला नाही. आजच्या संगणक युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे.

माझ्या मातृभूमीला विविधतेचा देश म्हणून देखील ओळखले जाते कारण माझ्या भारत देशामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात येथे

भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ, भेन्न विचार यांनी भारतीय संस्कृती जलेली आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्र कळ्यांचे कमळच जणू!

माझी मातृभूमी ही खरोखरच खूप महान आहे कोणत्या क्षेत्रांमध्ये माझी मातृभूमी मागे राहिलेली नाही. आज संपूर्ण जगभरामध्ये माझ्या भारत मातेला ओळखले जाते.

म्हणूनच मी अभिमानाने मायभूमी म्हणू शकतो की, माझी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *