गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी गरिबी एक शाप मराठी निबंध घेऊन आलोत.

मित्रांनो या जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ज्या आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतात.

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

या जगामध्ये प्रकाश आहे त्याचबरोबर अंधार देखील आहे अज्ञान आहे तेथे ज्ञान देखील आहे. फुल आहेत तेथे काठे देखील आहेत समस्या आहेत तर त्यावर पर्याय देखील आहेत. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक बाबी आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतात.

श्रीमंती आहे म्हणून आपल्या आजूबाजूला गरीबी देखील मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 मजली पर्यंतच्या इमारती पाहायला मिळतात तसेच करा की कहानी झोपडपट्टीमध्ये 10| 10 च्या रूम देखील पाहायला मिळतात.

परंतु या गोष्टीकडे कोणी बारकाईने विचार करत नाही म्हणून आपल्या देशांमध्ये गरिबी ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून ” गरिबी एक शाप मराठी निबंध | poverty Essay in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी एक गरिबी एक शाप मराठी निबंध घेऊन आलोत.

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

मित्रांनो आजच्या वर्तमान काळामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये श्रीमंत हा अधिकच श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हे अधिकच गरीब होत चालले आहेत.

आजच्या काळामध्ये श्रीमंत लोकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पंचपक्वानाचा आनंद घेताना आपण पाहतो याउलट गरीब लोकांना दोन वेळचे पोटभर जेवण देखील मिळत नाही. याचे कारण म्हणजे महागाई, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी असे काही असू शकते परंतु या कारणामुळे आपल्या देशाला गरिबीत सारख्या एका शापाने ग्रासले आहे. आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या वाढतच चाललेली आहे. गरिबी एक शाप बनला आहे.

मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांना गरीबी म्हणजे आर्थिक परिस्थिती कमी दर्जाचे असलेले लोक असे वाटते. परंतु घरी म्हणजे केवळ पैशाने कमी असलेले लोक नव्हे तर आपल्या समाजात असेही गरीब लोक आहेत ज्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही आणि अंगावरती घालण्यासाठी व्यवस्थित कपडे देखील मिळत नाही. ज्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाही अशा लोकांना आपण गरीब म्हणू शकतो.

आपल्या समाजामध्ये गरिबी एक शाप होण्याची विविध कारणे आहेत, त्यातील काही कारणे आम्ही पुढीलप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

गरिबीची सुरुवात :

मित्रांनो, आपल्या समाजामध्ये गरीब हा आत्ताच नाही तर प्राचीन काळापासून पाहायला मिळतो. आशा गरिबांचा उल्लेख रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्या मध्ये आढळतो.

आपल्या प्राचीन इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता आपल्याला दिसेल की, गरीब भिलानी शबरी यांनी श्रीरामांना मनुके खाऊ घालून त्यांचे स्वागत केले. तर महाभारतातील दुधाच्या अनुपस्थित गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला अश्वधामा त्याला पीठाचे द्रावण देण्यास भाग पाडले.

तर, भगवान श्रीकृष्ण हे तर स्वतः देवता असून त्यांचे मित्र सुदामा आहे एक गरीब परिवारातील होते.सुदामाच्या भीषण दरिद्रतेनेच त्याला मित्र श्रीकृष्णाच्या द्वारिकाकडे नेले होते. कदाचित म्हणूनच सुदामाला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन देखील घडले.

गरिबांचे जीवन :

या जगामध्ये सर्वापेक्षा जास्त दुर्देवी जीवन कोणाची असेल तर ते म्हणजे गरीब लोकांचे असते. गरिबीने त्रासलेल्या लोकांना राहण्यासाठी घर देखील नसते बहुतांशी गरीब लोक आपण फुटपाथ वर झोपलेली पाहत असतो. गरीब लोकांसाठी ऊन, वारा, पाऊस हे तिन्ही ऋतू एक समानच असतात.

मोठ्या शहरांमध्ये करोडपती लोक लोक राहतात म्हणून मुंबई ला सर्वात श्रीमंत समजले जाते, परंतु याच श्रीमंत शहरांमध्ये झोपडपट्टीमध्ये रहाणारे गरीब लोक देखील पाहायला मिळतात ज्यांना खाण्यासाठी अन्न असते. शरीर झाकण्यासाठी कपडे देखील नसतात.

एकीकडे श्रीमंत लोक महागड्या हॉटेलमध्ये जाऊन हजारो रुपयांचे जीवन खातात तर दुसरीकडे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना उपासमारीने मारावे लागते.

तसेच समाजातील गरीब लोकांना स्वतःच्या इच्छांना आणि स्वप्नांना मारू जीवन जगावे लागते. पालकांना देखील श्रीमंत पालकांप्रमाणे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ वाटते परंतु पैशाच्या आभावी गरीब पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही. गरिबीमुळे लहान वयामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलांना कामावर जावे लागते. थोडक्यात समाजातील गरीबी हा प्रगतीचा शत्रू आहे. म्हणून गरिबी एक शाप समजला जातो.

या व्यतिरिक्त गरीब लोकांना जीवन जगत असताना अपार कष्ट करावे लागते. त्यासोबतच वेगवेगळ्या आजारांना आणि महामारी न देखील तोंड द्यावे लागते. आजारपण हे गरीब आणि श्रीमंत पाहून येत नाही. परंतु समाजातील श्रीमंत लोकांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये गरीब लोक आजाराने ग्रासले असतात कारण गरीब लोकांना अस्वच्छता, दूषित अन्न , दूषित पाणी या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे समाजातील बहुतांश गरीब लोक हे मोठमोठ्या आजाराने ग्रासले आहेत परंतु पैशाच्या अभावी अशा लोकांना योग्य तो उपचार घेणे देखील शक्य नाही.

गुन्हेगारीला प्रेरणा :

आपल्या समाजातील गरिबीशी गुन्हेगारीला प्रेरणा देण्याचे काम करते.गुन्हेगारीचे किडे दारिद्र्याच्या घाणीत वेगाने वाढतात. गरीबी केवळ चोरी, दरोडे, खून, अपहरण, तस्करी इत्यादी गुन्हे करण्यास लोकांना प्रोत्साहित करते. गरीब गुन्हेगारांसाठी वकील मिळणेही अवघड होते.

हुंडा पद्धती :

आपल्या समाजामध्ये गरिबी सारखी कीड पसरवण्याचे काम हुंडापद्धती देखील करतात. पालकांना मुलीचं लग्न करण्यासाठी खूप कष्ट करावे लागते घाम गाळून पैसा जमा करावा लागतो. परंतु समाजातील रूढ हुंडाबळी सारख्या पद्धतीमुळे बरेचसे पालक आपल्या मुलीसाठी चांगल्या वराचा शोध घेणे व्यर्थ समजतात. त्यामुळे गरीब पालक हे त्या मुलीला गरीब घरा मध्येच देतात त्यामुळे समाजातील गरीबी हे वाढतच जाते.

गरिबी एक शाप :

समाजातील श्रीमंत लोकांकडून नेहमी गरीब लोकांची अवहेलना केली जाते. श्रीमंत लोक गरीब लोकांना नोकर प्रमाणे वागणूक देतात त्यामुळे गरीब लोकांचा आपल्या समाजातून तिरस्कार केला जातो. समाजातील श्रीमंत लोक गरीब लोकांना तुच्छ समजून त्यांची फसवणूक करतात. काही ठिकाणी तर गरीब लोकांच्या अशिक्षित पाणाचा फायदा घेतला जातो. गरिबांना सर्वत्र नाकारले जाते हे त्यांचे नशीब असते.

खरोखरच ! दारिद्र्य आणि गरीबी हा एक भयंकर शाप आहे.


 हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *